न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

आर्वी येथील सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल व धम्म प्रचारक लेखक व कवी सुरेश भिवगडेअर्पित

आर्वी येथील सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल व धम्म प्रचारक लेखक व कवी सुरेश भिवगडे

अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 
मो 8956647004
आर्वी मानवतेचे प्रचारक या बहुचर्चित कविता संग्रहाचे कवी सुरेश भिवगडे यांना त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्य व योगदानाबद्दल समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 
यासाठी सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिनांक 30 मार्च 2025 रोजी पारेगाव तालुका जिल्हा जालना येथे भीमगर्जना मित्र मंडळ पारेगाव येथील भंते कश्यप ली 
यांच्यावतीने समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
सुरेश भिवगडे हे सातत्याने बुद्ध धम्म प्रचाराचे कार्य करत असतात. 
तसेच साहित्यिक चळवळ व ग्रंथालयीन चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण सहभाग असतो. 
मानवतेचे प्रचारक हा बहुचर्चित कविता संग्रह प्रकाशित झाला असून 
येणाऱ्या काळात आदिवासी नायक व्यंकटेश आत्राम जीवनचरित्र व आर्वी तालुक्यातील आंबेडकरी चळवळ सामाजिक कार्यकर्त्यांची योगदान व साहित्यिकांचे साहित्य हा शोध प्रबंध, 
तसेच आदिवासी कवींच्या कवितांचे संपादन ते करत आहेत. 
अंत:करणातील मनीषा हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 
सामाजिक कार्य व धम्मकार्य तसेच उत्कृष्ट प्रवचनकार म्हणून ते सुपरीत आहेत. 
त्यांचे या कार्याची दखल घेऊन त्यांना समाज रत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 
सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

गुरुवार, २७ मार्च, २०२५

अर्पित वाहाणे यांची लोकसेवा काँग्रेस वर्धा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

अर्पित वाहाणे यांची लोकसेवा काँग्रेस वर्धा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

वर्धा: लोकसेवा काँग्रेस पक्षाच्या वर्धा जिल्हा उपाध्यक्षपदी अर्पित उत्तम वाहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नरेंद्र यांनी ही निवड जाहीर केली. अर्पित वाहाणे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांची जनसेवेची तळमळ आणि पक्षनिष्ठा पाहता त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पक्षाच्या विकासासाठी नवीन जबाबदारी

लोकसेवा काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरावरील संघटनेस अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. अर्पित वाहाणे यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अभिनंदनाचा वर्षाव

अर्पित वाहाणे यांच्या निवडीची माहिती मिळताच पक्षाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, वर्धा जिल्ह्यात लोकसेवा काँग्रेसचा अधिक विस्तार करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

अर्पित वाहाणे म्हणाले...

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अर्पित वाहाणे म्हणाले, "माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल. लोकसेवा काँग्रेसच्या विचारधारेनुसार कार्य करत, जिल्ह्यातील प्रत्येक घटकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे."

पक्षातील जेष्ठांचा पाठिंबा

या निवडीमुळे वर्धा जिल्ह्यात पक्षाच्या कार्यात अधिक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे. पक्षाच्या धोरणांना चालना देण्यासाठी अर्पित वाहाणे यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे.

अर्पित वाहाणे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. 8956647004

ही लढाई शेतकऱ्यांची आमच्या सर्वाच्या हक्काची सम्राटअशोक सेनेचा तीव्र अंदोलनाच्या इशारा अर्पित

ही लढाई शेतकऱ्यांची आमच्या सर्वाच्या हक्काची सम्राटअशोक सेनेचा तीव्र अंदोलनाच्या इशारा 

अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 
मो 8956647004

आजचा शेतकरी कर्ज बाजारी ना पिकी,ओला दुष्काळ पिकाला भाव नाही मुलांच्या लग्नाची जबाबदारी कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी,दवाखान्याची जबाबदारी हीया शेतकऱ्यांनी जगावं कसं
*मुख्यमंत्री साहेब आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा



अकोला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आपण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आज पर्यंत शेतक-यांचा सात बारा कोरा केला नाही तरी आपला शब्द आज पर्यंत पाळलेला नाही तरी त्यांनी शेतक-यांचा सात बारा कोरा करावा व शेतकरी कर्ज मुक्त करावा करिता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 14/11/2024 रोजी यांनी जाहीरसभे मध्ये असे आश्वासन दिले की आमचे सरकार आले तर आम्ही शेतक-यांचा 7/12 कोरा करून व शेतकरी कर्ज मुक्त करू असे आश्वासन दिले होते.परंतु फडणवीस चा सरकार आहे तरीही आज पर्यंत शेतक-यांचा सात बारा कोरा झाला नाही व शेतक-यांची कर्ज मुक्ती सुध्दा झाली नाही.विदर्भातील शेतक-यांना शारिरीक व मानसिक त्रास देत आहेत बँकेच्या त्रासामुळे पश्चिम विदर्भामध्ये 80 शेतक-यांची आत्महत्या आज रोजी पर्यंत झालेली आहे.तरी वरील मुख्यमंत्री यांनी शेतक-यांकडे त्यांचे सरकार आल्यानंतर लक्ष दिले नाही.तरी दिवसेंदिवस शेतक-यांची वाढती आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित मुख्यमंत्रीनी शेतक-यांचा 7/12 कोरा करावा व शेतकरी कर्ज मुक्त करावे आणि शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव  द्यावे असे या माध्यमातून आम्ही मागणी करतो.
*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य* 
        आकाश दादा शिरसाट 
  बळीराजा तू जीव नको फाशी 
  जग राहील तुझ्या बिना उपाशी