न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

EVM विरोधातले बाळराजे पाटील यांचे आंदोलन पेटले धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून निषेध

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

सोलापूर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठा, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष-श्री बाळराजे आवारे पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात EVM मशीनचा विरोधात दिनांक १६ जानेवारी पासून  आमरण उपोषण पुकारले आहे. 

आमरण उपोषणकरते बाळराजे आवारे पाटील यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे. की पूर्णपणे EVM मशीन बंद करण्यात यावी तसेच मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात यावी. EVM हटवा लोकशाही वाचवा असा संदेश देखील त्यांनी उपोषण स्थळी दिला आहे. EVM मशीन मुळे देशाची मान खाली जात असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे.

आमरण उपोषणाचे ५ दिवस उलटून गेल्यावर देखील शासनाकडून कुठलीच दखल घेण्यात आली नसल्यामुळे आज 
रोजी संतप्त झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर महामार्गावर  टायर जाळून निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला.

आपलं गाव आपलं विहार आपली जबाबदारीविनोद भाऊ भालेराव यांच्या विशेष पुढाकाराने व सातत्यपूर्ण प्रयत्नातून आज दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी धम्म बुद्ध विहार, कठोरा बु येथे बोर बांधण्याचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

या प्रसंगी उद्घाटनासाठी विनोदभाऊ भालेराव (मा.संचालक कृ.उ.बा.स.अम.,मा.सरपंच ग्रामपंचायत कठोरा बु तथा हल्ली सदस्य) व गावातील नागरिक उपस्थित होते.


वर्धा विहाराच्या संरक्षण, स्वच्छता व संवर्धनाच्या दृष्टीने करण्यात आलेले हे कार्य सामाजिक जबाबदारी व धम्म मूल्यांची जपणूक करणारे असून विनोद भाऊ भालेराव हे समाज हितासाठी करण्यात आलेल्या कार्यास सदैव अग्रेसर असतात 

विनोद भाऊ भालेराव यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

मुंबईच्या गुरुनानक कॉलेजच्या विद्यार्थ्यांची शिवनेरी किल्ल्याला भेट

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

सायन मुंबई, १९ जानेवारी २०२६: मुंबईतील गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (स्वायत्त), सायन येथील राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लबतर्फे SYBA, TYBA राज्यशास्त्र तसेच MA लोक प्रशासनच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याचे शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभूतपूर्व प्रशासकीय कौशल्य आणि स्वराज्य स्थापनेच्या तत्त्वांशी परिचित करणे होते. प्राध्यापक सुमीत खरात, राजकारण शास्त्र विभाग प्रमुख यांनी ही संकल्पना मांडली, तर संविधान क्लब समन्वयक प्राध्यापक अनिकेत उबाळे यांनी आयोजनासाठी सर्व मेहनत घेतली. दौऱ्यादरम्यान प्राध्यापक अनिकेत उबाळे यांनी विद्यार्थ्यांनी किल्ल्याची रचना, सामरिक महत्त्व आणि शिवाजी महाराजांनी विकसित केलेली प्रशासकीय व्यवस्था जसे अष्टप्रधान मंडळ, महसूल प्रणाली आणि न्याय व्यवस्था यांची विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्टे:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय मॉडेलचे प्रत्यक्ष अनुभवातून आकलन करणे, जे आधुनिक लोक प्रशासनासाठी प्रासंगिक आहे.
ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन राजकीय इतिहास आणि लोकशाही मूल्यांची समज वाढवणे.
विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जागरूकता आणि संवैधानिक मूल्यांबाबत जागृती निर्माण करणे.
सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक दृष्टिकोनाशी जोडून शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देणे.
हा दौरा विद्यार्थ्यांसाठी केवळ ज्ञानवर्धकच नव्हता, तर राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करणारा ठरला. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंदर कौर भाटिया आणि विभागाने विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि भविष्यात असे आणखी कार्यक्रम घेण्याची घोषणा केली.

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

३२ वा विद्यापीठ नामविस्तार सोहळा साजरा भारतीय दलित पॅंथर चे आयोजन


अर्पित वाहाणेवर्धा 
जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

 अमरावती( दि. १४ जानेवारी २०२६) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा तब्बल १७ वर्षाचा संघर्ष १४ जाने. १९९४ रोजी झालेल्या नामविस्ताराने संपुष्टात आला. या लढ्याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी बुधवारी भारतीय दलित पॅंथर अमरावती जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इर्विन )चौक येथे या लढ्यात जे लढवे शहीद झाले त्यांना आदरांजली तथा नामांतर चळवळीत सहभागी होऊन आपल्या आयुष्याचे मोलाचे बलिदान केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधीतज्ञ डॉ. पी.एस . खडसे, प्रमुख अतिथी खासदार बळवंत वानखडे, पूज्य भन्ते बुद्धप्रिय, पॅंथर नेते प्रभाकर घोडेस्वार,लक्ष्मण मेश्राम, सुधाकर पाटील, दादासाहेब क्षीरसागर, विनोद भालेराव, जयंत गवई, काशिनाथ बनसोड साहेबराव गुडसुंदरे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून, नामविस्ताराच्या आंदोलनात ज्यांनी प्राणाची आहुती दिली.त्या अमरावती जिल्ह्यातील दिवंगत झालेल्या पँथर कार्यकर्ते पँथर गंगाधर गाळे,पँथर धनराज सोनोने,पँथर अनिल गोंडाणे,पँथर ध्रुवकुमार बनसोड, पँथर बाळासाहेब मेश्राम,पँथर सतेस्वर मोरे,पँथर कृष्णा गणविर,पँथर ललित कुमार मेश्राम, पँथर रमेश खोब्रागडे,पँथर आनंद धवणे, पँथर सुनिल धवणे, पँथर रमेश वासणिक पँथर पद्माकर गजभिये, पँथर धनराज पांडुरंग डोंगरे, पँथर विजय धांड, पँथर तुळशिराम वानखडे, पँथर मधुकर सेलारे,पँथर अजाबराव घोडेस्वार, पँथर प्रभुदास खांडेकर,पँथर दामोदर गजभिये, पँथर किसनाबाई मेश्राम,पँथर उद्धव खांडेकर,पँथर वासुदेव भोवते, यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर या अस्तित्व,अस्मितेच्या लढा सहभागी झाले. त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर योद्धा म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्यामध्ये मानकरी सर्वश्री राजेंद्र शेंडे , शिवदास गायकवाड , विजय बनसोड , जानराव उगले , रामदास कटकतलावरे , राजु धवणे , पंडितराव मेश्राम, राजु भोयर , शेख नवाब कुरेशी , शाह कय्युम शाह, संजय वाघुळे , दिलीप बनसोड , विजयघरडे , उत्तमराव मेश्राम, रामेश्वर जवंजाळ , संघमित्रा उगले , नानाभाऊ रामटेके , प्रल्हादराव मेश्राम आदीसह दोनशे पन्नास नामांतर योध्यांचा समावेश आहे.       
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूज्य भदंत बुद्धप्रिय यांनी केले.सूत्रसंचालन भारतीय दलित पँथर चे सचिव अजय रामटेके तर आभार पँथर चे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय दलित पँथरचे पँथर प्रविण पाटील जिल्हा प्रमुख, पँथर लक्ष्मण भाऊ मेश्राम, पँथर मनोज धुळेकर, पँथर नंदु भाऊ खडसे, पँथर पंकज रंगारी, पँथर सचिन मेश्राम, पँथर मंगेश ससाने, पँथर राजपाल इंगळे, पँथर धर्मेंद्र बागळे, पँथर रवि भाऊ शेंडे, पँथर शिवदास गायकवाड, पँथर नागेश पाटील, पँथर प्रशांत रामटेके, पँथर मनोज कांबळे, पँथर आदित्य रंगारी पँथर , पँथर अभय रामटेके अरुण चव्हाण, पँथर अरुण वासनिक, पँथर विजय बनसोड, पँथर शिवसागर पानतावणे, पँथर अंकित मेश्राम, पँथर सुधाकर पाटील, पँथर राजु शेंडे, पँथर सुनिल कापशेकर यांनी परिश्रम केले.

पर्यवेक्षक पदाची मान्यता व नियमित वेतनासाठी सौ. रत्नमाला मेढे यांचे धरणे आंदोलनभीम आर्मी भारत एकता मिशन चा जाहीर पाठिंबा

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

वर्धा सौ. रत्नमाला मेढे यांना पर्यवेक्षक पदाची मान्यता देऊन नियमित वेतन मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी दिनांक 8/11/2026 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध पुरोगामी संघटनांच्या सहकार्याने धरणे आंदोलन सुरू केले आहे. सदर प्रश्न गेल्या एक वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित असून संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

या प्रकरणाची माहिती भीम आर्मी (भारत एकता मिशन) संघटनेने घेतली असता, सदर विषय मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मा. अनुसूचित जाती-जमाती आयोग तसेच शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी याबाबत निर्णय देऊन न्याय देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही, अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

अनुसूचित जाती-जमाती आयोगाने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना, प्रशासनाकडून होत असलेला विलंब हा अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलक व संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सौ. रत्नमाला मेढे यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

या अन्यायाविरोधात भीम आर्मी (भारत एकता मिशन) ने जाहीर पाठिंबा दर्शवून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे(रावण) ,जिल्हा संघटक आशिष सलोडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील, जिल्हा महासचिव अलकेश पाणबुडे, बबलू भाऊ राऊत,शुभम डुबडूबे,अनुराग डोंगरे, रोशन झामरे, सनी खैरे इत्यादी कार्यकते उपस्थित होते.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हारअर्पण करण्यात येणार रक्त दान ग्रुप अमरावती सिद्धार्थ दामोधरे यांनी केलेरक्त दान


अर्पित वाहाणे

आर्वी महानगर पालिका निवडणुक २०२६
आज दिनांक १४ रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान करणार आहे 
सर्वात प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हारअर्पण करण्यात येणार आहे 
त्यानंतर जिल्हा रुग्णालय ब्लड बँक अमरावती येथे 
आझाद समाज पार्टी अमरावती* जिल्हा पदअधिकारी शहरातील कार्यकर्ते तसेच 
आंबेडकरी चळवळीत कार्यकर्त यांनी उपस्थिती राहवे ही विनंती आपला सिद्धार्थ दामोधरे मी माझे २६ रक्त दान 
मतदार राज व मायबाप जनता
यांना समर्पण करतो रक्त दान श्रेष्ठ दान
रक्त दान ग्रुप अमरावती सिद्धार्थ दामोधरे

एस सी एस टी आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा, आरक्षण मोडीत काढण्याचा न्यायालयीन कट उघड!



अर्पित वाहाणे आर्वी
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

नवी दिल्ली भाजप नेते अश्विनी उपाध्याय याची याचिका आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार ह्यांना दिलेली नोटीस हा कायदेशीर प्रश्न किंवा संविधानिक सुधारणेचा प्रयत्न नाही तर हा SC/ST आरक्षण संपवण्याचा उघड डाव आहे.

या कटाचा केंद्रबिंदू आहे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांचा तो ऐतिहासिकदृष्ट्या घातक निकाल, ज्याने SC/ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा घुसवला. तेवढ्या साठीच गवई यांना सरन्यायाधीश म्हणून प्रमोट करण्यात आले होते.

प्रश्न आहे की संविधानाला धुडकावून लावण्याचा अधिकार न्यायालयाला कोणी दिला आहे? कारण कलम १५(४) मध्ये आर्थिक निकषांचा एक शब्दही नाही तसेच कलम १६(४) पुरेसे प्रतिनिधित्व म्हणजे सत्ता, पदे, निर्णयक्षम ठिकाणी वाटा दिला जाणे आवश्यक आहे.मग प्रतिनिधित्वाचा प्रश्न बाजूला सारून गरिबीचा बनाव का? ‘क्रिमी लेअर’चा फसवा मुद्दा कसा पुढे आला?

कारण आहे अनुसूचित जाती जमाती मधील विविध समाज सत्तेत आले आहेत, निर्णय घेऊ लागले आहेत.त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेची झोप उडाली आहे. त्याकाळीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सावध केलं होतं की “राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे.” आज ती गुरुकिल्ली बहुजनांच्या हातात जाऊ नये म्हणून न्यायालयाचा वापर करून संविधानाचा विपर्यास सुरू आहे.म्हणून ‘क्रिमी लेअर’सारखे हत्यार न्यायालयाने वापरले आहे.

खरे तर न्यायमूर्ती गवई यांचा निकाल बहुजनविरोधी, घटनाविरोधी आणि सवर्ण वर्चस्व टिकवणारा आहे. आरक्षणाचे उपवर्गीकरण निकालात गवईने हे हत्यार सरकार आणि न्यायालयाचे हातात दिले आहे.त्यामुळे आज ‘क्रिमी लेअर’,
उद्या आरक्षणाची टक्केवारी,
परवा आरक्षणच रद्द करण्याचा हा टप्प्याटप्प्याने चाललेला आरक्षण संहार कार्यक्रम आहे.

ह्यावर अनुसूचित जाती जमाती गप्प बसणार नाही. संविधानाची मोडतोड आम्ही कदापी मान्य करणार नाही.आरक्षणावर हात टाकणाऱ्यांना रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल. कारण आरक्षण भीक नाही, दया नाही. आरक्षण हा आमचा घटनात्मक अधिकार आहे.
स्कस्तरेसेर्व्हशनसावेरेसेर्व्हशनकॉन्स्टिटयूशनअंडरथ्रीटसोसिअलजास्तीचेआंबेडकरितेबाबासाहेबांबेडकररेसेर्व्हशनीसरिघात
कॉन्स्टिटयूशनलरीघट्सक्रीमयलायेरडेबाते
नॉक्रीमयलायेरीन्सकस्टजुडिसिएलोवेरा्रेच
सुपरमेकोर्टींडियारेसेर्व्हशनपॉलिसिय
कास्टसनसूस