न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

सप्रेम जय भिमआपणांस 1 जानेवारी 2026 रोजी भिमा कोरेगाव शौर्य दीन वर्धा इथे साजरा

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा करण्यात येत असून हा कार्यक्रम संगीतमय संध्या असणार असून या कार्यक्रमाचे मुख्य गायिका मां.मंजुषा शिंदे ( फेम लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरांत),आंबेडकरी कवयित्री (वंदना गौतम,उत्तरप्रदेश) 1 जानेवारी भिमा कोरेगाव शौर्य दीन विशेष गाथा समजवून सांगण्या साठी येत असलेले आंबेडकरी विचारवंत मां.प्रशिक आनंद सर व स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणाऱ्या तरुण तरुणींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध मां.विठ्ठल कांगणे सर यांचं मार्गदर्शन लाभणार असून आपण या कार्यक्रमाला आर्थिक सहयोग करीत असून आपल्या या समाज हितकारी कार्यक्रमात उपस्थिती सुद्धा प्रार्थनीय आहे तरी आपण आर्थिक सहयोग करीत असल्या मुळे आपले मनस्वी अभिनंदन* 
*धन्यवाद
*विनीत ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा जिल्हा*

रस्त्यावरचा झटणारा धडाडीचा कार्यकर्ता – सिद्धार्थ दामोधरे



अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

आर्वी _रक्तदात्यापासून चळवळीच्या अग्रभागी, आता नगरसेवक पदाच्या दिशेने वाटचाल_ 

 सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सतत व सातत्याने समाजाच्या सेवेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याची खरी ओळख त्याच्या कार्यातूनच पटते. लोकांच्या डोळ्यांतला विश्वास, लोकांच्या जिभेवर उमटणारी प्रशंसा आणि लोकांच्या मनात तयार झालेली जागा – हेच त्याच्या आयुष्याचे भांडवल असते.

आज सिद्धार्थ दामोधरे यांच्याबाबत बोलायचं झालं, तर हा केवळ कार्यकर्ता नाही तर संघर्षाचा पर्याय आहे. चळवळीत आक्रमकता, संघर्षात कणखरता, रस्त्यावर उतरण्याची तयारी आणि समाजातील पीडित-शोषित माणसाच्या न्यायासाठी झटणारा एक ‘धडाडीचा कार्यकर्ता’ अशी त्यांची ठळक ओळख आहे.

रक्तदान चळवळीपासून सुरुवात करून त्यांनी शेकडो रुग्णांना जीवनदान दिले. अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्ताची गरज भागवली. त्यामुळे त्यांचा चेहरा समाजात रक्तदात्याचा, जीवदान देणाऱ्याचा बनला.

लग्नात वधू-वरांची मिळवणी असो, पीडित नागरिकांची शासकीय कामे मार्गी लावणे असो किंवा अडचणीत सापडलेल्या गरजूंच्या मदतीला धावून जाणे असो – सिद्धार्थ दामोधरे हे प्रत्येक ठिकाणी आघाडीवर दिसतात. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे – “संघटनेचं वजन पाठीशी असेल तर फसलेलं काम पटापट मार्गी लागतं. आणि मी यासाठीच पक्षात काम करतो – समाजातील प्रत्येकाची समस्या सोडवण्यासाठी!”

काळ्या करणारे, अडथळे निर्माण करणारे कार्यकर्ते वाढल्याने त्यांनी वंचित आघाडी सोडून आता आझाद समाज पार्टीमध्ये काम सुरू केलं. तरीदेखील बाळासाहेब आंबेडकरांविषयी त्यांच्या मनात अपार आदर व निष्ठा आहे. पण ज्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात तिथे थांबून बसणं त्यांच्या रक्तात नाही. म्हणूनच नवे मार्ग स्वीकारून त्यांनी कामाला नवी गती दिली.

त्यांची लोकप्रियता एवढी आहे की शहरात ते घरातून बाहेर पडले की शेकडो लोक “जय भीम”, “नमस्कार”, “आदाब” म्हणत त्यांचे स्वागत करतात. ही लोकप्रियता त्यांच्या कामाची खरी पावती आहे.

कुटुंबाकडेही तितकंच लक्ष देणाऱ्या या कार्यकर्त्याची मुलगी दहावीला 92% गुण मिळवते आणि तिचा सत्कार जिल्ह्याचे कलेक्टर, अधिकारी, राजकीय नेते, शिक्षक करतात – ही बाब सिद्धार्थ दामोदरे यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. धर्मकार्य असो, धम्मदान असो किंवा सामाजिक उठाव असो – ते सर्वत्र अविरत उपस्थित राहतात.
आता मात्र जनतेचा आग्रह, लोकांचा हट्ट स्पष्ट दिसतोय 
“आमच्या वार्डाचे नगरसेवक म्हणून यावेळेस सिद्धार्थ दामोदरेच हवेत!”

वर्धा लोकप्रियतेची, सामाजिक बांधिलकीची आणि धडाडीची पावती म्हणून या वेळेस सिद्धार्थ दामोधरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संघर्ष, आक्रमकता, समाजसेवा आणि नेतृत्वगुण यांची सांगड घालणारा हा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने ‘रस्त्यावरचा प्रखर योद्धा’ आहे.

आगामी निवडणुकीत हा प्रखर कार्यकर्ता नगरसेवक झाला तर लोकांच्या आशा-आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील, यात शंका नाही.

गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

आर्वी शहरातील फुले-शाहू- आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते मा रामचंद्र कांबळे जनतानगर यांचे आर्वी वर्धा सांवंगी मेधे दवाखान्यात इथे निधन झाले

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

आर्वी वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजारामुळे मंगळवार दिनांक १६/१२/२०२५ ला सावंगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुधवार दिनांक १७/१२ ला दुपारी १२:३० वाजता त्यांचे राहते घरी जनतानगर आर्वी येथून होणार आहे. स्मृतिशेष रामचंद्र कांबळे यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!

दिवंगत रामचंद्रजी कांबळे 
नागपूरच्या धम्मक्रांतीनंतर धम्म प्रबोधन व सामाजिक चळवळीसाठी गावोगावी जाऊन कार्यक्रम व प्रबोधन करणारा सच्चा भीमसैनिक.
हे आर्वी शहरातील 
जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते व आरपीआयचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे तसेच पुढे कालांतराने बामसेफ कामही त्यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आर्वीच्या माध्यमातून
माननीय वजीर भाई व गुणवंतराव हिवसे यांच्यासोबत त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 
त्यांच्या कार्यकाळात 
आर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चा कार्यक्रम हा सात दिवस चालायचा.
सांस्कृतिक जनजागृती पथकाच्या माध्यमातून जनजागृती चे काम त्यांनी केले. 
रामदासजी काळे देविदासजी दहाट फुलाजी काळबांडे सुखदेवराव काळबांडे बाबुरावजी नाखले इत्यादींचा 
या मित्रमंडळी सोबत त्यांनी सामाजिक कार्य केले. समता सैनिक दल आर्वी 
यातही त्यांचा सहभाग राहिलेला आहे.
सोबतच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी आर्वी शहरात 
मोठ्या प्रमाणात केली होती. 
समता वाचनालय स्थापनेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. व सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. 
फुले शाहू आंबेडकर सामाजिक संस्था आर्वीच्या माध्यमातून 
त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
मच्छीमार संस्था निर्माणातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. 
एक वाचनाची सवय असलेला अभ्यासू व्यक्तिमत्व आज आर्वी शहरातून निघून गेले 
नुकत्याच आर्वी मध्ये संपन्न झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात त्यांच्या कार्याचा गुणगौरव करत संमेलनाध्यक्ष 
कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
 सुरेश भिवगडे

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

दिनांक डिसेंबर 2025स्थळ : नागपूर जन सुरक्षा कायद्याविरोधातील याचिका ‘वेळेआधी’ असल्याने फेटाळली

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

कायदा लागू होताच पुन्हा न्यायालयात जाणार : विक्की सवाई


वर्धा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल, 2025 (जन सुरक्षा कायदा) याला आव्हान देणारी जनहित याचिका (PIL) सामाजिक कार्यकर्ते विक्की महेंद्र सवाई यांनी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती.

आज झालेल्या सुनावणीत माननीय उच्च न्यायालयाने ही याचिका कायद्याच्या मुद्द्यांवर चुकीची नसून, फक्त “वेळेआधी (premature)” असल्यामुळे फेटाळली आहे.
न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की,
 सदर कायद्यावर अद्याप राज्यपाल/राष्ट्रपतींची मंजुरी (Assent) मिळालेली नसल्याने तो कायदा अद्याप अंमलात आलेला नाही,त्यामुळे या टप्प्यावर न्यायालय थेट हस्तक्षेप करू शकत नाही.

महत्वाचे म्हणजे, न्यायालयाने याचिकेतील मुद्द्यांवर कोणतीही प्रतिकूल टिप्पणी केलेली नाही.
न्यायालयाने हेही स्पष्ट केले की हा कायदा अंमलात आल्यानंतर याचिकाकर्त्यास पुन्हा न्यायालयात येण्याचा पूर्ण अधिकार आहे.

याचिकाकर्ते विक्की सवाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की “न्यायालयाने माझी याचिका चुकीची नाही असे स्पष्ट केले आहे.
फक्त कायदा अद्याप लागू न झाल्यामुळे ती या टप्प्यावर फेटाळण्यात आली आहे.
हा कायदा लागू होताच मी पुन्हा उच्च न्यायालयात जाऊन
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14, 19, 21, 22 आणि 32 च्या आधारे
या कायद्याला कडाडून विरोध करणार आहे.
ही लढाई वैयक्तिक नसून लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे.”



जन सुरक्षा कायदा हा सामाजिक कार्यकर्ते, आंदोलक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी वापरला जाऊ शकतो, अशी भीती अनेक संघटनांनी व्यक्त केली असून, यापूर्वी राज्यभरातून हजारो निवेदने शासनाला देण्यात आली होती. कायदा लागू होताच या विषयावर पुन्हा मोठी न्यायालयीन लढाई होणार असल्याचे संकेत याचिकाकर्त्यांनी दिले आहेत.संपर्क:विक्की महेंद्र सवाई
सामाजिक कार्यकर्तायाचिकाकर्ते जनहित याचिका