न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी संतोष शिवदास आमले यांची निवड

पनवेल प्रतिनिधी

मुंबई दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित म्हामुणकर यांनी मीडिया क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेऊन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी पनवेलचे रहिवासी व दैनिक युवक आधारचे संपादक श्री. संतोष शिवदास आमले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सिनेसृष्टीत तसेच सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. कलाकार दिग्दर्शक यांच्याशी चांगला संपर्क असून सामाजिक क्षेत्र व पत्रकार क्षेत्रामध्ये दैनिक युवक आधार च्या माध्यमातून आमले यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून मीडिया क्षेत्रात संघटनेच काम वाढवण्यास मदत होईल.

युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “मीडिया विभाग हा चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि पत्रकार यांच्यातील दुवा मानला जातो. श्री. आमले यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्रभरातील माध्यम प्रतिनिधींना योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

कोट
सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय
संतोष आमले हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम, कला व सांस्कृतिक चळवळींमध्ये अग्रेसर आहेत. विविध संस्थांमार्फत त्यांनी युवकांना प्रोत्साहन दिले असून पत्रकारिता आणि समाजकारण क्षेत्रात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.दिग्दर्शक व अभिनेता विकास वायाळ

आमले यांची भूमिका
आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. आमले म्हणाले,
दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या मीडिया विभागाचे महाराष्ट्र राज्याध्यक्षपद मिळणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ तसेच पत्रकार यांना न्याय, सुविधा आणि योग्य मान-सन्मान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. महाराष्ट्रातील सिनेसृष्टीचा गौरव वाढवणे हेच माझे ध्येय असेल.कोट

या नियुक्तीबद्दल श्री. आमले यांचे विविध मान्यवर, पत्रकार, कलाकार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकाळात मीडिया विभाग अधिक गतिमान होईल आणि दादासाहेब फाळके यांचे नाव उज्ज्वल ठेवणाऱ्या चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत मोलाची भर पडेल, असा विश्वास आहे 
-अजित म्हामुणकर अध्यक्ष दादासाहेब फाळके चित्रपट युनियन

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

नागपूर हायकोर्ट, नागपूर संघर्षरत विक्की सवाई यानी संस्थापक अध्यक्ष वीर अशोक सम्रासंघटना यांनीजाणाहीत याचिका दाखल केली

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा शहरात शासनाचा मेडिकल कॉलेज व रुग्णालय पुन्हा सुरू करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका वर आज बॉम्बे हायकोर्ट, नागपूर खंडपीठात सुनावणी घेण्यात आली.

याचिकाकर्ता वीर अशोक सम्राट संघटना, वर्धा तर्फे संस्थापक अध्यक्ष विक्की महेंद्र सवाई यांनी स्वतः (in-person) न्यायालयात बाजू मांडली.

माननीय न्यायमूर्ती श्री. अनिल एस. किलोऱ आणि माननीय न्यायमूर्ती श्री. रजनीश आर. व्यास यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
प्रतिवादी (Union of India, Ministry of Health & State of Maharashtra) तर्फे उपस्थित AGP/सरकारी वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख 19 सप्टेंबर 2025 निश्चित केली आहे.

ही जनहित याचिका संपूर्ण वर्धा शहर व जिल्ह्याच्या आरोग्य, शिक्षण आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
याचिकाकर्त्याने न्यायालयास विनंती केली आहे की वर्धा शहरात पूर्वी प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालय तातडीने पुन्हा स्थापन करण्यात यावे.

या संघर्षामुळे वर्धा जिल्ह्यातील जनतेला नवी आशा मिळाली असून आता सर्वांचे लक्ष 19 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागलेले आहे.संघर्षरत

गुरुनानक महाविद्यालयात 'लोकशाही सप्ताह'निमित्त पोस्टर स्पर्धा मुंबई सायनपार पडली

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा मुंबई सायन येथील गुरुनानक महाविद्यालयात दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी 'लोकशाही सप्ताह' (९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर) निमित्ताने "लोकशाही मूल्ये आणि घटनादर्शनी तत्त्वज्ञान" या विषयावर भव्य पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ह्या स्पर्धेचे आयोजन राज्यशास्त्र विभाग, 'इलेक्टोरल लिटरेसी क्लब' व संविधान क्लब' यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.  

या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विभागांमधून ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे तत्त्वज्ञान, घटनात्मक मूल्ये आणि समाजातील लोकशाहीचा प्रभाव विविध चित्ररचनांद्वारे प्रभावीपणे मांडला. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी तरुण पिढीच्या दृष्टिकोनाचे अनोखे दर्शन या स्पर्धेतून घडले.  

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि मार्गदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुमित खरात तसेच संविधान क्लबचे समन्वयक प्रा. अनिकेत उबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यात संविधान क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष रोहन उघाडे, उपाध्यक्ष सायमा खान, सचिव शैफ खान, खजिनदार प्रिया शेट्टियार, तृतीय वर्षाची वर्गप्रतिनिधी नूरिन सोलकर, उपवर्गप्रतिनिधी रोहिणी देवेंद्र तसेच एहसान शेख, तौफिक शेख, गायत्री, जयशुदा, भूमिका शर्मा, शबनम, सनम, जफिरा, रितिका, महक तसेच तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.  

लोकशाही मूल्ये आणि जागरुकतेचा प्रसार करण्यासाठी अशा स्पर्धा प्रभावी ठरत असल्याचे मत सहभागी व प्राध्यापकांनी व्यक्त केले.

समतानगरवासीयांच्या वतीने गटविकास अधिकारी पदावर नवनियुक्त रुजू झाले साळवे साहेब यांचे स्वागत केले



वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी . साळवे साहेब यांचे स्वागत समता नगरवासी यांच्या वतीने करण्यात आले. स्वागत आटोपल्यानंतर समता नगर मधील वाशी यांच्या समस्यांचे निवेदन सुद्धा त्यांना देण्यात आले त्यावेळी त्यांनी तात्काळ निवेदनावरती शेरा मारून संबंधितांना ते निवेदन पाठविले यावरून त्यांची कार्य तत्परता पाहायला मिळाली असे कर्तव्यदक्ष अधिकारी वर्धा पंचायत समितीला लाभल्यामुळे भविष्यामध्ये वर्धा पंचायत समितीच्या कामाला गती मिळेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली. यावेळी सम्यकदृष्टी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मनोज डोंगरे सचिव राजु थुल उपाध्यक्ष सुरेश वैद्य,सुभाष गायकवाड, बंडुजी नाखले, भाकेकर व समता नगर मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

वर्धा. प्रवासादरम्यान काल ला सोनल वाणी यांची बॅग खडगी नागपूर रोडवर पडलेली होती ती बॅग यवतमाळ येथील



अर्पित वाहाणे

वर्धा नारायनराव थुल शाळा संस्थापक यांना सापडली त्यांनी लगेच राजू थुल यांना फोन केला त्यांनी निखिल गजभिये नागपूर यांना ही गोष्ट सांगितली ज्या प्रमाणे पोलीस विभागाचे चक्र फिरते अगदी त्याप्रमाणे चक्र फिरले व अगदी 2 तासामध्ये ती बॅग सोनाली वाणी यांना परत केली. नारायनराव थुल यांच्या प्रामाणिकपणामुळे ती बॅग परत मिळाल्याचे सोनाली वाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नारायनराव थुल यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे. समाजात नारायनराव थुल सारखे व्यक्ती असल्यामुळे प्रामाणिकपणा जिवंत आहे
राजू भाऊ थूल. समाज भूषण पुरस्कार प्राप्त, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे बॅग परत करण्यास खूप मदत झाली.असेही नारायनरावं थुल म्हनाले

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

विष्णुप्रसाद भारती द्वारा प्रथम आर्वी शहरातआयोजित गणपती बाप्पा सजावट स्पर्धाआर्वी बक्षीस वितरण कार्यक्रम शप्पणन झाला

वर्धा अर्पित वाहाणे
मो 8956647004

आर्वी आमदार सुमितदादा वानखेडे आर्वी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले या मध्ये स्पर्धेचे प्रथम बक्षीस जगदीश तेजमल भूतडा रा. आर्वी द्वितीय बक्षीस सोहम रा. अनिल वाघ रा. जळगाव,तृतीय बक्षीस दिक्षा प्रविण विंचूरकर रा. आर्वी, चतुर्थ बक्षीस सर्वज्ञ गणेश देऊळकर रा. आर्वी सर्वं विजेत्यांचे आमदार सुमितदादा वानखेडे यांनी व या स्पर्धेचे आयोजक विष्णुप्रसाद भारती यांनी सर्वं विजेत्यांचे अभिनंदन केले.

,यावेळी उपस्थित विजयजी गिरी, अविनाशजी टाके, बाळासाहेबजी गुजरकरराधिकाताई भारती, वैष्णवीताई विठोले नितेश वानखेडे, प्रामुख्याने उपस्तित होते.

स्मृतीशेष इंजि. राजेश पाटील यांचे बुद्धा टेकडीवर पर्यावरण पूरक अस्थि विसर्जन

 
वर्धा अर्पित वाहाणे

रूढी आणि परंपरेला फाटा देत भर पावसात पाटील परिवाराने पार पडला अंत्यसंस्कार .

 वर्धा :- भारतीय रेल्वे विभागात कार्यरत इंजिनीयर राजेश देविदास पाटील यांचे कर्तव्यावर असताना वयाच्या 52व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात आई कौशल्या पाटील, पत्नी मनीषा रा .पाटील,मुले अरिहंती व अर्हत पाटील,भाऊ प्रमोद,विनोद व प्रफुल पाटील,आणि माजी नायब तहसीलदार भगवान वनकर आणि कुटुंबातील सदस्यांच्या वतीने कोणतेही कर्मकांड ,रुढी, परंपरेला फाटा देत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार त्यांच्या अस्थी वाहत्या पाण्यात विसर्जित न करता त्या अस्थी स्थानिक बुद्ध टेकडीवर दोन खड्डे करून त्यामध्ये अस्थी आणि राख पुरून बोधी वृक्ष व बकुळ वृक्षाचे रोपण करून पर्यावरणपूरक कृतिशील आदरांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी माजी नायब तहसीलदार भगवान वनकर यांचे अध्यक्षतेखाली आदरांजली सभा घेण्यात आली. प्रारंभी वंदना विशेष कार्यकारी अधिकारी राजूभाऊ थुल यांनी घेतली. विविध मान्यवरांनी व कुटुंबीयांनी आपले आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले. या सभेचे सूत्रसंचालन सुनील ढाले यांनी केले.यावेळी शाक्य संघ बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, बुद्ध टेकडीचे सदस्य प्रणोज बनकर , दिनेश वाणी, सचिन धोंगडे कुटुंबातील पुष्पा पाटील, मीनाक्षी पाटील,सीमा पाटील,कुमुद वनकर,मोहनीश पाटील,विभा पाटील ,आकांक्षा वनकर,साहस वनकर ,अनिल कांबळे, विजय नगराळे,अभय बागडे,दीपचंद कांबळे,जयंत फुलझेले,किरण कांबळे, सचिन कांबळे,योगीराज फुलझेले,रजत भगत,विकास आटे, राजकुमार पाटील इ कुटुंबीय , आप्तसकीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. . या प्रसंगी पाटील परिवाराच्या वतीने बुद्धा टेकडी विकासासाठी नऊ हजार चे धम्मदान प्राप्त झाले.

दैनिक युवक आधारचा दुसरा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य साजरा . मार्गदर्शन व गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा सन्मान

मुंबई -: पनवेल व महाराष्ट्रात पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दैनिक युवक आधार या वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन उद्घाटक सुधीर कटेकर, न्यूज १८लोकमत चे सहसंपादक विलास बडे व साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्या मार्गदर्शन पत्रकारांना लाभले तसेच उद्योगपती सुधीर कटेकर , प्रसिद्ध अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात गुणवंत कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करत दै.युवक आधार पत्रकार टीमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असेल असा निर्धार संपादक संतोष शिवदास आमले यांनी करत दैनिक युवक आधारचा दुसरा 
वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.

 या सोहळ्यास विविध मान्यवर, पत्रकार बांधव,वाचक तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज 18 लोकमतचे सहसंपादक व प्रसिध्द अँकर विलास बडे, साम टीव्ही चे संपादक निलेश खरे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माधवी जुवेकर , बाल कलाकार अर्जुनी सस्ते , उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

आपल्या मनोगतात विलास बडे यांनी “पत्रकारिता पाठीच्या कणाप्रमाणे भूमिका बजावत ताट पणे समाजाचे प्रश्न मांडून न्याय दिला पाहिजे विविध आणखी मार्मिक मार्गदर्शन पत्रकारांना त्यांनी केले असून ‘दैनिक युवक आधार’ने अल्पावधीतच सत्य व समाजहिताला प्राधान्य देणारे काम केले आहे.

साम टीव्हीचे संपादक निलेश खरे म्हणाले, “स्थानिक प्रश्नांना न्याय देणे, सर्वसामान्यांच्या अडचणी मांडणे आणि सकारात्मक घटनांना वाचा फोडणे हेच पत्रकारितेचे खरे ध्येय आहे. ‘दैनिक युवक आधार’ हे काम प्रभावीपणे करत असून वाचकांचा विश्वास संपादन करत आहे,” असे मत व्यक्त केले.

अभिनेत्री माधवी जुवेकर यांनी “पत्रकारिता आणि कलाक्षेत्र या दोन्हींचा समाजावर दूरगामी परिणाम होतो. ‘दैनिक युवक आधार’ने सत्याचा मार्ग स्वीकारत सामाजिक बदल घडविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, सर्वांनी नागरिकशास्त्र अभ्यास करत ते जपले पाहिजे व त्याप्रमाणे वागले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी दैनिक युवक आधारला शुभेच्छा दिल्या 

या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण, कला-संस्कृती, सामाजिक कार्य, आरोग्य व उद्योजकता अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी दैनिक युवक आधारच्या दोन वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला व आगामी काळात आणखी सामाजिक आणि पत्रकारितेच्या उपक्रमांना गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

दुसऱ्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्यामुळे दैनिक युवक आधारची वाटचाल अधिक प्रेरणादायी व प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र संपादक अजय कापरे, सहसंपादक मुकुंद कांबळे, कार्यकारी संपादक जगन्नाथ रासवे, उपसंपादक विलास गायकवाड, महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख प्रदीप पाटील, कोकण विभाग विजय दुंद्रेकर,रायगड प्रतिनिधी प्रमुख एम डी भोईर, महाराष्ट्र उपसंपादक राजू शिंदे, पनवेल तालुका प्रतिनिधी प्रमुख मच्छिंद्र पाटील, बीड जिल्हा प्रतिनिधी मारुती सत्रे पनवेल महानगर प्रतिनिधी प्रमुख जगदीश क्षीरसागर, मीडिया प्रमुख अनुराग आमले, शंतनु भालेराव, आदित्य शेटे, आर्यन शेटे, राहुल माने, कैलास नेमाडे, प्रसाद हनुमंते, कैलास रक्ताटे, अण्णासाहेब आहेर कार्यक्रम नियोजक विशाल सावंत नियोजन समिती अध्यक्ष बाळा झोडगे इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले .

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

तळेगाव येथे ईद-ए-मिलाद उन नबी जल्लोषात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

वर्धा प्रतिनिधी अर्पित वाहाणे

तळेगाव जामा मस्जिद येथून सकाळी ८ वाजता
मिरवणुकीची सुरुवात झाली.संपूर्ण शहरातून ही मिरवणूक फिरली,ज्यामध्ये मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला.मिरवणुकीदरम्यान नात पठण, सलाम पठणआणि अमन, प्रेम आणि भाईचाऱ्याचा संदेश देण्यात आला.शहरातील गल्लीबोळ सजवण्यात आले होतेआणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या प्रसंगी थानेदार साहेब व PSI साहेब यांचेस्वागत व सत्कार असद खान व बाबा भाई यांनी केला,तसेच AIMIM शहराध्यक्ष फ़ाज़िल खान यांनीपत्रकार बांधवांचा सन्मान करूनकार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.संपूर्ण कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीआणि पोलिस प्रशासनाने उत्तम बंदोबस्त ठेवन्यात आला होता.

गुरुनानक महाविद्यालयाचा मुंबई उच्च न्यायालय अभ्यास दौरा

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा सायन येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व संविधान क्लबच्या संयुक्त विद्यमाने प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील ऐतिहासिक मुंबई उच्च न्यायालयाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

या दौर्‍यात विद्यार्थ्यांनी न्यायालय कसे कार्य करते, वकील कशाप्रकारे युक्तिवाद करतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच उच्च न्यायालयाचे ऐतिहासिक महत्त्व आणि न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा यांचा थेट परिचय झाला.

भ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध न्यायालयीन कक्ष कोर्ट रूम्स पाहिले व चालू न्यायप्रक्रिया जवळून समजून घेतल्या. याशिवाय माननीय न्यायमूर्तींच्या वाचनालयाला (Hounerable Judges’ Library) तसेच हायकोर्ट संग्रहालयालाही भेट देण्याची संधी मिळाली.

या शैक्षणिक उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना माननीय न्यायमूर्ती व अधिवक्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. या संवादातून त्यांना न्यायप्रक्रिया, घटनात्मक जबाबदाऱ्या व विधिक परंपरा यांचे सखोल ज्ञान मिळाले.

या दौऱ्याच्या यशस्वी आयोजनात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुमित खरात यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर संविधान क्लबचे समन्वयक प्रा. अनिकेत रविंद्र उबाळे यांनीही सक्रिय भूमिका बजावली.

महाविद्यालय व्यवस्थापन व प्राध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की शिक्षणाबरोबरच अशा प्रकारचा प्रत्यक्ष अनुभवविद्यार्थ्यांसाठीआयुष्यभरउपयोगीठरेल आणि घटनात्मक मुल्यांबद्दलची त्यांची निष्ठा अधिक दृढ करेल.”