न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

दुर्गेश्वरी जगजेकर हिचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा

विशेष प्रतिनिधी आवाज जनतेचा न्यूज.25

मोहन साहेबराव जगजेकर यांच्या लाडक्या कन्या दुर्गेश्वरी मोहन जगजेकर हिचा प्रथम वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कुटुंबीय, नातेवाईक, मान्यवर तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पाहुण्यांसाठी जेवणाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.

तसेच वाढदिवसाच्या सोहळ्याला अधिक रंगत आणण्यासाठी DJ चे विशेष आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. 

या आनंददायी सोहळ्यात सर्व पाहुण्यांनी लाडकी दुर्गेश्वरीला मनःपूर्वक आशीर्वाद देत, निरोगी व दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छांचा वर्षाव केला. 

सरस्वती देवी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

न्युज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड

मुखेड -: दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी  बाराहाळी येते सरस्वती देवी शाळेत स्वातंत्र्यदिनी  रंगबेरंगी फराळे लावून तिरंग्याच्या रंगात तिरंगा रांगोळी काढून शाळा सजवण्यात आली होती,
 15 ऑगस्ट 1947 ला अंग्रेजीच्या गुलामीतून आपला देश मुक्त झाला असून मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या देशातील अनेक वीर  देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले असल्यामुळे ते आठवण  प्रत्येकाच्या मनामध्ये असायला हवी यासाठी स्वातंत्र्य दिन म्हणून 15 ऑगस्ट ला तिरंगा ध्वज मोठ्या आनंदाने फडकला जातो ,
तसेच बाराळीतील सरस्वती देवी शाळेमध्ये यावेळी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची व सर्वांगीण गुण आणण्यासाठी देशभक्तीच्या गाण्यावर विद्यार्थ्यांचे नृत्य कार्यक्रम घेण्यात आले ,
 ए वतन मेरे वतन ,भारत की बेटी,  देश मेरा, अशा अनेक विविध देशभक्तीच्या गाण्यावर लहान चिमुकल्या  विद्यार्थिनी खूप छान डान्स केला असून खेळातील व भाषणातील प्रथम , द्वितीय, तृतीय, आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवर मुख्याध्यापक व पालकांच्या हस्ते पारितोषिक व वह्या पेना वाटप करण्यात आले,
यावेळी शाळेचे कोषाध्यक्ष  मनीष अर्जुने सर ,यांच्या हस्ते तिरंगी ध्वज फडकवण्यात आला, व तसेच शाळेचे मुख्याध्यापक ओम पाटील सर यांनी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी यांच्या फोटोला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले , यावेळी   डीएम इंगोले सर , रेडी सर, रमेश बोरले सर, शिंदे सर, पाटील सर,  दीपक पाटील सर, विद्यार्थी पालक सर्व शिक्षक गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते,
 

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

बाराहाळी येथील ग्रामपंचायत नवीन इमारत अभ्यासिका केंद्राचे व नमो ग्रामसचिवाल इमारतीचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

न्युज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड

मुखेड - दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी बाराळी येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे व अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन खासदार रवींद्र चव्हाण, यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले असून पुढे भाऊसाहेब देशपांडे मंगल कार्यालयामध्ये खासदार रवींद्र चव्हाण यांनी बोलताना पुढे म्हणाले की माझे खासदार निधी मधून मी बाराहाळी साठी वीस लक्ष रुपये विकास कामाकरिता देणार आहे बाराहळीचा विकास करण्यासाठी मी निधी कमी पडू देणार नाही . 

पुढील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती, इलेक्शन लवकरच होतील त्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागायचा आहे,
राहुल गांधी आपल्या पाठीशी आहेत काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे काँग्रेस नेते राजन देशपांडे हे बाराळी व बाराळी परिसरातील जनतेचा विकास करतील त्यांना रस्ते नाल्या अनेक कामे करायचे आहे,  

 बाराहाळीच्या जनतेने नेहमी त्यांच्या पाठीशी राहावे , मी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे तसेच लेंडी धरणातील गेलेल्या शेतकऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न राहिलेला लवकरच मार्गी लावणार आहे, व तसेच नांदेड बिदर हायवे रस्ते चा काम रखडलेला आहे ते नितीन गडकरी शी बोलून लवकरच रस्त्याचे काम करणार आहे , असेही बोलण्यात आले

यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार मुखेड श्रावण रेपनवाड, अब्दुल सत्तार, नांदेड माधवराव पाटील उंदरीकर, हनुमंत नारनाळीकर , आकाश वडजे पाटील, गंगाधर पाटील इंगळे घोडके पाटील, सुभाष पाटील, पाळेकर, सुरेश पाटील बेळीकर, विलास पाटील सोशल मीडिया अध्यक्ष, रंजीत पाटील दापके कर, पत्रे ताई राजन देशपांडे अनेक दिग्गज काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मंचावर उपस्थित होते, तसेच

 ग्रामपंचायत मधील सरपंच अंजलीताई राजन देशपांडे उपसरपंच वळगे पाटील, ग्रामसेवक जाधव पाटील, सोसायटीचे चेअरमन व्यंकट पाटील उमाटे ,बजरंग उमाटे ग्रामपंचायत सदस्य माधव राजे वाड प्रकाश भंगे शाहीर मारुती वाघमारे पांडू रंग पाटील उमाटे सचिन वाघमारे ,प्रकाश वाघमारे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गावकरी व तसेच ग्रामीण भागातील 35 खेडे 52 तांड्यातील महिला, पुरुष, कार्यकर्ते, हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते, 

बाराहाळी येथील गोविंद नगर या प्लॉटिंग जमिनीचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन संपन्न

प्रतिनिधी प्रताप देवरे मुखेड नांदेड 

मुखडे - दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी पांडुरंग गोविंदराव उमाटे पाटील यांच्या मालकी जमिनीत प्रकाश नगर चौकात बाराळी येथे फ्लोटिंग बोर्डाचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पांडुरंग पाटील यांच्या जमिनीचे विक्री केलेले कागदपत्रे ग्राहकांना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले पांडुरंग पाटील उमाटे यांच्या शेतातील जमिनीत एक एकर चे प्लॉट पाडून प्लॉट विक्रीसाठी काढून त्या नगरचे नाव गोविंद नगर असे ठेवले आहे त्यामुळे या उद्घाटन प्रसंगी तसेच माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर मुखेड डॉक्टर श्रावण रे पण वाढ, 
 राजू पाटील, रावणगावकर ,काँग्रेस अध्यक्ष अब्दुल सत्तार नांदेड, राजन देशपांडे , अनेक दिग्गज कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते,
 तसेच गावातील उपस्थित कार्यकर्ते व्यंकट पाटील उमाटे, बालाजी बोईनवाड, हुसेन पठाण, बालाजी वल्लभ वाढ, शाहू पाटील उमाटे, विजय वाघमारे, बालाजी जाधव पाटील, अमोल वाघमारे , रंजीत पाटील, फोटो वाले मुजीब शेख, गावातील अनेक शेकडोच्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते, 
न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस साजरा करणार नाही,असे बेताल वक्तव्य करणा-या आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचा बिरसा फायटर्सने केला निषेध

अशोक उईके यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975

शहादा -: ९ ऑगस्ट २०२५ हा जागतिक आदिवासी दिन मी साजरा करणार नाही,असे बेताल वक्तव्य करणा-या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे..असे बेताल वक्तव्य करणा-या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जगदीश डुडवे, जितेंद्र भंडारी,जंत्र्या पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.संयुक्त राष्ट्र संघाने १९९३ रोजी आदिवासींच्या सन्मानार्थ ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केलेला आहे.देशभरात ९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आदिवासी दिनानिमित्त राज्यातील आदिवासी बहूल सर्व जिल्ह्य़ात तालुक्यात,गावात सांस्कृतिक देखावे रॅली,
मेळावे,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.ऐवढेच नाही तर काही जिल्ह्यात आदिवासींचे हक्क व अधिकारासाठी आंदोलने व मोर्चे काढले जातात.संपूर्ण विश्वात ९ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात आदिवासी समुहाच्या साजरा केला जात असतांना महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मी आदिवासी दिवस साजरा करणार नाही ,असे निंदनीय वक्तव्य केले आहे.अशोक उईके हे प्राध्यापक म्हणून आदिवासी समाजाच्या आरक्षणावर नोकरीला लागले आहेत व आदिवासी मंत्री सुद्धा आदिवासी आरक्षणाच्या आधारेच झाले आहेत, याचे भान मंत्री विसरले आहेत. अशोक उईके यांच्या या बेताल वक्तव्य मुळे संपूर्ण आदिवासी समाजात संताप निर्माण झाला आहे.आदिवासी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून आदिवासी विकास मंत्री श्री.अशोक उईके यांनी आदिवासी समाजाची तात्काळ माफी मागावी .

चुकीचे औषध फवारणीसाठी दिल्याने शेतातला पूर्ण कापूस मेला; भाऊतात्या कृषी सेवा केंद्र चांदसैलीच्या दुकानदारावर कारवाईची बिरसा फायटर्सची मागणी

सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975

शहादा -: भाऊतात्या कृषी सेवा केंद्र चांदसैली ता.शहादा जि.नंदुरबार येथील दुकानदाराने कापूस पिकावर चूकीचे औषध फवारणीसाठी दिल्याने शेतकरी मद्रास उदय वळवी राहणार चांदसैली तालुका शहादा यांच्या अडीच एकर शेतातील ५ पिशवी पेरणी केलेले कापसाचे पूर्ण पिक मेले आहे.त्या शेतक-यास नुकसान भरपाई मिळावी व चुकीचे औषध देऊन शेतक-यांची फसवणूक करीत मोठे आर्थिक नुकसान करणा-या दुकानदारावर कायदेशीर कडक कारवाई करा व दुकान तात्काळ बंद करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जगदीश डुडवे, जितेंद्र भंडारी,जंत्र्या पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

 नंदुरबार जिल्ह्य़ात शेतात बी पेरल्यानंतर फवारणीसाठी औषधे व खते घेणा-या शेतक-यांची संख्या कृषी सेवा दुकानात वाढली आहे.नंदूरबार जिल्हा आदिवासी बहूल जिल्हा आहे.बरेच शेतकरी हे अशिक्षित व अडाणी आहेत.त्याचा गैरफायदा घेऊन भाऊतात्या कृषी सेवा केंद्र चांदसैली ता.शहादा जि.नंदुरबार येथील दुकानदाराने चांदसैली गांवातील शेतकरी श्री. मद्रास उदय वळवी यांना कापूस पिकावर फवारणीसाठी बुरशीनाशक अम्बीशन, सुजला व इतर चुकीचे औषध दिल्यामुळे अडीच एकर शेतातील सुमारे ५ पिशवी कापूसचे पीक मेले आहे. सदर शेतक-याने दुकानदाराकडे तक्रार केल्यानंतर दुकान दाराने पुन्हा चुकीचे औषध दिले.अशे वारंवार चूकीचेच औषध दुकानदार देत असल्यामुळे शेतातील कापसाचे पीक मरण पावले आहे.शेतातील कापसाचे पीक मेल्यानंतर दुकानदाराने शेतकऱ्यास १ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला.१ हजार रूपयांत एवढी मोठी नुकसान भरपाई होणार नाही.यावरून दुकानदाराची चूक लक्षात येते व दुकानदाराला पिकांसाठी फवारणी करण्याचे औषधाबाबत माहिती नाही,असे दिसून येते.त्यामुळे सदर दुकानदाराकडून अनेक शेतक-यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.दुकानदार बोगस व चूकीचे ओषध विकून शेतक-यांची फसवणूक व लुबाडणूक करीत आहे.
बोगस व चूकीच्या औषधांमुळे पिकांची वाढ होण्याऐवजी पीक मेले आहे.शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.