नांदेड -: विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून भाजपाच्या श्रीजया चव्हाण यांची दणदणीत विजय मिळवला. गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ काँग्रेसचा पंरपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. श्रीजया चव्हाण यांच्या विजयाने चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भोकरमध्ये पहिल्यांदाच कमळ उमलले आहे
अर्थात काँग्रेस सोडल्याचा राग आणि मतदरासंघात असलेले विरोधी वातावरण पाहता अशोक चव्हाण यांनी योग्य काळजी घेत श्रीजया चव्हाण यांना निवडून आणलेच. आता भोकर मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांचे पाय घट्ट रोवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पक्ष बदलला तरी भोकरवर असलेले आपले वर्चस्व कदापी कमी होणार नाही याची दक्षता अशोक चव्हाण यांच्याकडून घेतली जात आहे. यासाठीच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चव्हाण यांनी बेरोजगारीच्या प्रश्नाला हात घातला...
उमेद अंतर्गत येत्या शनिवारी ता.22 भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याच्या तयारीत अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण या दोघांनी सुरूवातीपासून लक्ष घातले. BJP विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, श्रीजया चव्हाण यांनी भोकर मतदारसंघ व नांदेड जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न प्राधान्याने सोडण्याचे वचन दिले होते. या वचनाच्या पूर्ततेच्या दिशेने या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून श्रीजया चव्हाण या पहिले पाऊल टाकत आहेत
22 फेब्रुवारी रोजी अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यासंदर्भात जिल्ह्यात बैठका, नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे सकाळी 9 वाजता हा रोजगार मेळावा होणार आहे..
या मेळाव्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सुमारे 120 नामांकित कंपन्या विविध पदांसाठी भरती करणार आहेत. आमदार श्रीजया चव्हाण यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे जिल्ह्यातील सगळे समर्थक कामाला लागले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा