न्यायासाठी बोलणारा आवाज

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वी


अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

आर्वी संविधान दिनानिमित्त त्रिशरण बुध्द विहार, भिमसैनिक अशोक कुंभारे परिसर, स्टेशन वार्ड, देऊरवाडा रोड, आर्वी येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व त्रिशरण बुध्द विहार आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय दिलीप पखाले (शासकीय विद्युत कत्राटदार) यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मा. उमेश म्हैसकर तर स्वागताध्यक्षपदी मा. ओमप्रकाश पाटील यांनी आपले महत्वाचे विचार मांडले. दीप प्रज्वलन मा.कमलेश कामडी आणि सुजित भिवगडे (सामाजिक कार्यकर्ते) व उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांनी केले. संविधान प्रास्ताविक वाचन मा. भीमरावजी मनवर आणि मा. प्रविण सातपुते यांनी केले.
कार्यक्रमाला सन्माननीय विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित होते मा. चंद्रकांत ढोले (पोलीस उपअधीक्षक आर्वी), मा. सतिश डेहनकर (ठाणेदार पोलीस स्टेशन आर्वी), मा. अमित गायकी (उपकार्यकारी अभियंता आर्वी), मा. डॉ. राजपाल भगत (प्रदेशाध्यक्ष स्वराज्य आघाडी महाराष्ट्र राज्य), आणि 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भन्ते धम्मज्योती (वर्धा), मा. ॲड. अरविंद काळे, मा. प्रा. डॉ. अनिल दहाट, मा. प्रा. पंकज वाघमारे, मा. प्रा. डॉ. प्रविण काळे, मा. प्रफुल्ल कांबळे, मा. बाबाराव सोमकुवर, मा. एम. के. चतुर साहेब, मा. प्रा. डॉ. विजयाताई मुळे, मा. मधुभाऊ सोमकुंवर, मा. प्रविण तंबाके, सौ. भारती बनसोड, मा. सचिन पाटील व प्रा.स्नेहल सोनोने यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा गौरव वाढवला.
या कार्यक्रमात विशेष सत्कारमुर्ती म्हणून आयुष्यमती उषाबाई हरिदासजी रंगारी (बुद्धमूर्ती दानदात्या) व संजय कळणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य पुतडा उभारला त्या साठी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पार्वताबाई दहाट यांचा सततच्या प्रोत्साहन व धम्मदानाबद्दल गौरव करण्यात आला सुनील कांबळे यांनी संविधान वाटप केले.
कार्यक्रमात निशाताई धोंगडे (फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या राष्ट्रीय प्रबोधनकार, सुप्रसिद्ध गायिका, सिनेमा अभिनेत्री व नाट्यकलावंत) यांनी भीमगीत आणि संविधान जागराचे सुंदर सादरीकरण केले, ज्याने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श एकता सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे यांनी केले, तर कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रा. अमर काशिनाथ भोगे (उपाध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना) यांनी केले. आणि आभार मा. विनोद कांबळे (सचिव आदर्श एकता सामाजिक संघटना) यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले, ज्यामध्ये महिंद्र घोडे, आकाश मुन, प्रमोद घोडीले, मंगेश सरोदे, विजय गजभिये, राजू डोंगरे, तेजस डोंगरे,अविनाश थोरात, भूषण इमाने, शुभांगी कुंभारे, सुलोचना कुंभारे, चंदा सरोदे, सीमा गोंडणे,मेघा सरोदे,चंदा डोंगरे, छकुली माहुरे, विजय कुंभारे, विनोद कांबळे, स्वाती थुल, राकेश वरठी, प्रदीप बनसोड, सोमेश्वर भगत, विलास बनसोड,दिनेश सिंगणापुरे,विनोद सरोदे,मंगेश सरोदे, हंसपाल भगत, सुरेंद्र पाखले यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
हा कार्यक्रम संविधानाचे महत्त्व व सामाजिक एकतेचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचा ठरला. यावेळी आर्वी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

समता सैनिक दल (SSD) शताब्दी वर्षजय भीम! नमो बुद्धाय

 बाबू हरदास एल.एन. यांच्या जयंती व स्मृति
 दिनानिमित्त दिनांक 11/1/2026 ते 15/1/2026 पर्यंतच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिर बाबू .हरदास.एल परिसर ड्रॅगन पॅलेस टेंपल रोड कामठी ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला 

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

आर्वी साथींनो, आमच्यासाठी हे अत्यंत अभिमान आणि आनंदाचे आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले 'समता सैनिक दल' आपले गौरवशाली १०० वर्षे (शताब्दी वर्ष) पूर्ण करित आहे...... 
मित्रांनो समता सैनिक दल ही एक स्वाभिमानाचे संघटन, स्वाभिमानाची मदतसमता हे बाबासाहेबांचे ते प्रामाणिक आणि शिस्तबद्ध संघटन आहे, ज्याने कधीही कोणत्याही राजकीय पक्ष किंवा मोठ्या पूंजीपतींकडे हात पसरला नाही. हे संघटन आजही बाबासाहेबांच्या तत्त्वांवर अढळ राहून फक्त आपल्या गरीब जनतेने आणि स्वाभिमानी समाजाने घामाच्या कमाईतून दिलेल्या सहकार्यावर उभे आहे.बाबासाहेबांनी या संघटनेची काळजी घेण्यासाठी आपला रक्त-पास धुडगाळलेला होता. आता वेळ आली आहे की आपण त्यांच्या या वारशाला आणखी मजबूत करू.'Pay Back to Society' पासून 'Show Back Society' पर्यंतबाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 'Pay Back to Society' (समाजाला परत देणे) हे मंत्र दिले. या साखळीत आपण एक पाऊल पुढे टाकून 'Show Back Society' या तत्त्वावर विश्वास ठेवतो. याचा अर्थ स्पष्ट आहे:दानही देऊ: समाजाप्रती आपली जबाबदारी निभावत आर्थिक सहकार्य करणे.हिशोबही हक्काने मागू: संघटनेची पूर्ण पारदर्शकता ठेवणे जेणेकरून समाजाचे पैसे समाजाच्या उत्थानातच खर्च होतील.आमची आपणास विनम्र विनंती आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तुमच्या योगदानाची अत्यंत गरज आहे. जर आपण स्वतःला बाबासाहेबांचे खरे अनुयायी मानतो, तर या वैचारिक लढाई आणि उत्सवात आपले तन, मन आणि विशेषतः 'धन' (आर्थिक मदत) समर्पित करावे लागेल.तुमचे छोटेसे योगदान या संघटनेच्या पायाभूताला आणखी मजबूत करेल.हे दान नाही, तर समाजाप्रती तुमचे कर्तव्य आणि गुंतवणूक आहे.आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतासाठी मन खुला करून मदत करा.चला, या गौरवशाली कार्यक्रमाला यशस्वी करू आणि जगाला दाखवू की समता सैनिक दल आजही बाबासाहेबांच्या विचारांची मशाल ज्वलत ठेवत आहे.आपण ह्या कॅम्पमध्ये येणाऱ्या कॅडेट करिता जेवणाची सोय म्हणून तांदूळ गहू तेल व इतर काही खाद्यपदार्थ कॅम्प परिसरात पाठवून किंवा आर्थिक सहकार्य धम्मदान निलेश मेश्राम ह्या नावाने बारकोडवर सुद्धा पाठवू शकता आपण दिलेल्या धम्मदानाची पोच पावती मोबाईल वरती शेअर करा हीच विनंती खऱ्या अनुयायी व्हा, लढ्यात साथी व्हा शेवटी निळा भडक..जय भीमच मार्शल निलेश मनोहर मेश्राम तालुका संघटक स. सै. द युनिट कामठी जि. नागपूर
मो नंबर:-9823095280

रविवार, ४ जानेवारी, २०२६

तब्बल 15 वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या घड्याळा ची आर्वी नगर पालिकेत दमदार एन्ट्री

काल झालेल्या नगराध्यक्षा व 
नगरसेवक पदग्रहण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौं भारती दिलीप पोटफोडे यांचा सत्कार

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

आर्वी नप निवडणुकीत अजितदादा पवार च्या राष्ट्रवादी ने 1 नगराध्यक्ष व 5 प्रभागात 6 उमेदवार उभे करून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी अतिशय नियोजन बद्ध व शांत संयमी पद्धतीने खेळी करत -
1 जागा जिंकली - 1 जागेवर 2 रया क्रमांकांची मते मिळवली,
 तर सर्वात कमी खर्च करून देखील परिश्रमच्या आणि कार्यकर्त्याच्या जोरावर नगराध्यक्षा यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली, 
आर्वी : - नुकतीच आर्वी नगर परिषद ची निवडणूक आटोपली आणि काल नगर परिषद आर्वी चे मुख्याधिकारी मा. डॉ श्री.किरणजी सुक्कलवाड यांनी नगराध्यक्षा व नगरसेवक यांचा दिमाखदार पदग्रहण व सत्कार सोहळा निमंत्रित केला होता 
या पदग्रहण सोहळ्याला प्रामुख्याने आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री सुमितजी वानखेडे, आर्वी शहराचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व माजी नगराध्यक्ष मा. श्री. डॉक्टर वसंतरावजी गुल्हाने, नवनियुक नगराध्यक्षा सौं स्वाती प्रकाश गुल्हाने, भाजपा गटनेते संजय थोरात, विरोधी पक्ष नेता प्रा. पंकज वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे नेते आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, ऍड क्षितिजा वानखेडे, भाजपा शहर अध्यक्ष राहुल गोडबोले, यांची उपस्थिती होती.
आर्वी नगर पालिकेत 15 वर्षा आधी बंद झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाची टिक टिक, आता पुन्हा प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेल्या सौं भारती दिलीप पोटफोडे यांच्या दमदार एंट्री मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा आवाज आर्वी नगर पालिकेत धडाडणार, अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे, 
 पदग्रहण कार्यक्रमात मुख्याधिकारी डॉ किरणजी सुक्कलवाड यांनी नगराध्यक्षा व सर्व 25 नगरसेवक यांना निमंत्रित करून संविधान उद्देशीका देऊन पुष्प गुच्छ व शुभेच्छा देत सत्कार केला यावेळी मोठया संख्येने आर्वीकर नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकारी व नप अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला

भा.पो.से. अधिकारी सदानंद दाते, यांनी महाराष्ट्र 
 
अर्पित वाहणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

आर्वी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक 

 रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या पश्चात १९९० तुकडीचे भा.पो.से. अधिकारी सदानंद दाते, यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र पोलीस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल.