न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

अकोला बाजार येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात पाण्याची गळती.

वर्धाअर्पित वाहाणे

वर्धा यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार या गावी असलेल्या सिद्धार्थ बुद्ध विहारात गेल्या काही दिवसांपासून स्लॅबच्या पाण्याची गळती होत आहे. सोबतच विहाराच्या बाजूला असलेल्या नालीचे संपूर्ण पाणी विहारात येत असल्याने विहारात बसायला सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही. सदर विहाराच्या इमारतीचे बांधकाम 2006 साली झाली असून, या इमारतीला आता जवळपास 20 वर्षे होत आहे. वरून स्लॅप पूर्णपणे गळती धरत आहे. व ही इमारत कधीही कोसळू शकते. याबाबत ग्रामपंचायतकडे मागणी केली असता, अकोला बाजार येथील सरपंच श्री. योगेश राजूरकर यांनी विहाराची पाहणी केली व सध्याचा पर्याय म्हणून स्लॅब ची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले. सर्व बौद्ध समाज बांधवांची एकच मागणी आहे की विहाराच्या इमारतीची नवीन बांधणी करून द्यावी व इमारतीच्या बाजूला असलेले नालीचे बांधकाम करावे, जेणेकरून पुन्हा कधीही नाल्याचे पाणी विहारात व परिसरात जाणार नाही. तसेच समाज बांधवांना प्रवचन देण्यासाठी बौद्ध भिक्खू तिथे निवासी राहत असून त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो करिता सर्व समाज बांधवांकडून बौद्ध विहाराचे दुरुस्ती व नवीन बांधकामाची मागणी होत आहे

मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा मंडपास वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री मा. डॉ. पंकज भोयर यांनी भेट दिली.

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा – मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने भव्य शुभेच्छा मंडप बाजार चौक, वर्धा येथे उभारण्यात आला होता. या मंडपाला आज वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री मा. डॉ. पंकज भोयर यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादुन्नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा मंडपाच्या भेटीदरम्यान मुस्लिम सोशल फोरमचे पदाधिकारी एस .के. सलीम उर्फ सल्लू भाई, रिझवान पठाण, आसिफ खान, अकरम शेख, इद्दू भाई व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे स्वागत केले. 
मुस्लिम बांधवांनी दिलेल्या आत्मीय सत्कारास मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रतिसाद देत सर्वांना सद्भावनेचा व समाजकल्याणाचा मार्ग अंगीकारण्याचे आवाहन केले.

मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी मंत्री महोदयांचे आभार मानले व पुढेही समाजहितासाठी असे कार्यक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने सर्वांना ईद ए मिलादुन्नबीच्या हार्दिक शुभेच्छा

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत ऐतिहासिक संयुक्त सभा

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित ऐतिहासिक संयुक्त सभा दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ३ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.  
या सभेला समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक आद. मार्शल सुनील सारीपुत्त राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख आद. ॲड. मार्शल प्रकाश दार्शनिक, यांनी प्रमुख उपस्थिती लावली. तसेच केंद्रीय कमिटी सदस्य आद. मार्शल सुरेश जाधव (मुंबई), महाराष्ट्र राज्य संघटक प्रा. मार्शल अनिकेत उबाळे* यांच्यासह मुंबई विभागातील समता सैनिक दल व इतर संस्था, संघटना यांचे प्रांतीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, समता सैनिक दलाचे राज्य कमिटीचे वरिष्ठ सदस्य मार्शल विजय वासनिक (यवतमाळ), महाराष्ट्राचे राज्य कार्यकारी मंडळ सदस्य मार्शल हिवराज टेंभूर्णे, विदर्भ प्रांत संघटक मार्शल निवारण कांबळे (चंद्रपूर) तसेच भंते सायरन प्रियदर्शी (बिजनौर) यांनीही या सभेत सहभाग घेतला.  

सभेदरम्यान ऑल इंडिया बुद्धिष्ट फोरमचे महासचिव आकाश लामा आणि भंते विनाचार्य यांच्यासोबत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची रणनीती आखण्यात आली. आंदोलनाच्या माध्यमातून बौद्ध समाजाच्या हक्कासाठी न्याय्य मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त झाला.  

दरम्यान, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक आद. सुनील सारीपुत्त सर व राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख आद. मार्शल ॲड. प्रकाश दार्शनिक सर यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आदरांजली वाहिली. या सर्व पदाधिकाऱ्यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा असून त्यांनी मुंबई विभागाच्या समता सैनिक दलाच्या टिटवाळा स्थित कार्यालयास ही सदिच्छा भेट दिली.  

कार्यक्रमाच्या शेवटी, समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी "महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला" पुढील पिढीची बांधिलकी म्हणून आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प करावा असे आवाहन समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक प्राध्यापक मार्शल अनिकेत उबाळे यांनी केले.

अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना 100 टक्के अनुदानावर स्कुटी

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा जिमाका जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत 5 टक्के दिव्यांग निधीतून या वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांना स्कुटी पुरविण्यात येणार आहे. या योजनेचा दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ यांनी केले आहे.
सदर योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार असून यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी संबंधित पंचायत समितीस्तरावर संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह दि.30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावा. अर्जसोबत वैश्विक ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र इत्यांदी कागपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांनी कळविले आहे.

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

सुनील डोंगर याची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली



वर्धा अर्पित वाहाणे

आर्वी महात्मा ज्योतिराव फुले,शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कांशीराम साहेब यांची चळवळ महाराष्ट्रा मध्ये प्रखर तळमळीने एक कार्यकर्ता म्हणुन बहुजन समाजाला एकत्र करून चळवळीला एक नविन नेतृत्व*म्हणुन आम्ही त्यांना बघतो असे निस्वार्थी, निष्ठावान, प्रामाणिक पायाला भिंगरी बाधुन न थकता फिरनारे, मिशन वाढविणारे महराष्ट्राचे स्वतः एक कार्यकर्ता म्हणून बघणारे आमचे मार्गदर्शक अँड . सुनिलजी डोंगरे साहेब यांची आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यानीं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदावर फेरनिवड केल्याबद्ल मा. अँड. सुनिलजी डोंगरे साहेब यांचे बहुजन समाज पार्टी 
नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब ब्राम्हणे, जिल्हा प्रभारी मा .जितेंद्र भाऊ तायडे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचे कडून खुप खुप अभिनंदन
BSP जिन्दाबाद, BSP जिन्दाबाद