अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
आर्वी वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजारामुळे मंगळवार दिनांक १६/१२/२०२५ ला सावंगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुधवार दिनांक १७/१२ ला दुपारी १२:३० वाजता त्यांचे राहते घरी जनतानगर आर्वी येथून होणार आहे. स्मृतिशेष रामचंद्र कांबळे यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!
दिवंगत रामचंद्रजी कांबळे
नागपूरच्या धम्मक्रांतीनंतर धम्म प्रबोधन व सामाजिक चळवळीसाठी गावोगावी जाऊन कार्यक्रम व प्रबोधन करणारा सच्चा भीमसैनिक.
हे आर्वी शहरातील
जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते व आरपीआयचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे तसेच पुढे कालांतराने बामसेफ कामही त्यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आर्वीच्या माध्यमातून
माननीय वजीर भाई व गुणवंतराव हिवसे यांच्यासोबत त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
त्यांच्या कार्यकाळात
आर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चा कार्यक्रम हा सात दिवस चालायचा.
सांस्कृतिक जनजागृती पथकाच्या माध्यमातून जनजागृती चे काम त्यांनी केले.
रामदासजी काळे देविदासजी दहाट फुलाजी काळबांडे सुखदेवराव काळबांडे बाबुरावजी नाखले इत्यादींचा
या मित्रमंडळी सोबत त्यांनी सामाजिक कार्य केले. समता सैनिक दल आर्वी
यातही त्यांचा सहभाग राहिलेला आहे.
सोबतच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी आर्वी शहरात
मोठ्या प्रमाणात केली होती.
समता वाचनालय स्थापनेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. व सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.
फुले शाहू आंबेडकर सामाजिक संस्था आर्वीच्या माध्यमातून
त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
मच्छीमार संस्था निर्माणातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे.
एक वाचनाची सवय असलेला अभ्यासू व्यक्तिमत्व आज आर्वी शहरातून निघून गेले
नुकत्याच आर्वी मध्ये संपन्न झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात त्यांच्या कार्याचा गुणगौरव करत संमेलनाध्यक्ष
कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
सुरेश भिवगडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा