न्यायासाठी बोलणारा आवाज

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

३२ वा विद्यापीठ नामविस्तार सोहळा साजरा भारतीय दलित पॅंथर चे आयोजन


अर्पित वाहाणेवर्धा 
जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

 अमरावती( दि. १४ जानेवारी २०२६) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा तब्बल १७ वर्षाचा संघर्ष १४ जाने. १९९४ रोजी झालेल्या नामविस्ताराने संपुष्टात आला. या लढ्याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी बुधवारी भारतीय दलित पॅंथर अमरावती जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इर्विन )चौक येथे या लढ्यात जे लढवे शहीद झाले त्यांना आदरांजली तथा नामांतर चळवळीत सहभागी होऊन आपल्या आयुष्याचे मोलाचे बलिदान केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधीतज्ञ डॉ. पी.एस . खडसे, प्रमुख अतिथी खासदार बळवंत वानखडे, पूज्य भन्ते बुद्धप्रिय, पॅंथर नेते प्रभाकर घोडेस्वार,लक्ष्मण मेश्राम, सुधाकर पाटील, दादासाहेब क्षीरसागर, विनोद भालेराव, जयंत गवई, काशिनाथ बनसोड साहेबराव गुडसुंदरे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून, नामविस्ताराच्या आंदोलनात ज्यांनी प्राणाची आहुती दिली.त्या अमरावती जिल्ह्यातील दिवंगत झालेल्या पँथर कार्यकर्ते पँथर गंगाधर गाळे,पँथर धनराज सोनोने,पँथर अनिल गोंडाणे,पँथर ध्रुवकुमार बनसोड, पँथर बाळासाहेब मेश्राम,पँथर सतेस्वर मोरे,पँथर कृष्णा गणविर,पँथर ललित कुमार मेश्राम, पँथर रमेश खोब्रागडे,पँथर आनंद धवणे, पँथर सुनिल धवणे, पँथर रमेश वासणिक पँथर पद्माकर गजभिये, पँथर धनराज पांडुरंग डोंगरे, पँथर विजय धांड, पँथर तुळशिराम वानखडे, पँथर मधुकर सेलारे,पँथर अजाबराव घोडेस्वार, पँथर प्रभुदास खांडेकर,पँथर दामोदर गजभिये, पँथर किसनाबाई मेश्राम,पँथर उद्धव खांडेकर,पँथर वासुदेव भोवते, यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर या अस्तित्व,अस्मितेच्या लढा सहभागी झाले. त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर योद्धा म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्यामध्ये मानकरी सर्वश्री राजेंद्र शेंडे , शिवदास गायकवाड , विजय बनसोड , जानराव उगले , रामदास कटकतलावरे , राजु धवणे , पंडितराव मेश्राम, राजु भोयर , शेख नवाब कुरेशी , शाह कय्युम शाह, संजय वाघुळे , दिलीप बनसोड , विजयघरडे , उत्तमराव मेश्राम, रामेश्वर जवंजाळ , संघमित्रा उगले , नानाभाऊ रामटेके , प्रल्हादराव मेश्राम आदीसह दोनशे पन्नास नामांतर योध्यांचा समावेश आहे.       
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूज्य भदंत बुद्धप्रिय यांनी केले.सूत्रसंचालन भारतीय दलित पँथर चे सचिव अजय रामटेके तर आभार पँथर चे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय दलित पँथरचे पँथर प्रविण पाटील जिल्हा प्रमुख, पँथर लक्ष्मण भाऊ मेश्राम, पँथर मनोज धुळेकर, पँथर नंदु भाऊ खडसे, पँथर पंकज रंगारी, पँथर सचिन मेश्राम, पँथर मंगेश ससाने, पँथर राजपाल इंगळे, पँथर धर्मेंद्र बागळे, पँथर रवि भाऊ शेंडे, पँथर शिवदास गायकवाड, पँथर नागेश पाटील, पँथर प्रशांत रामटेके, पँथर मनोज कांबळे, पँथर आदित्य रंगारी पँथर , पँथर अभय रामटेके अरुण चव्हाण, पँथर अरुण वासनिक, पँथर विजय बनसोड, पँथर शिवसागर पानतावणे, पँथर अंकित मेश्राम, पँथर सुधाकर पाटील, पँथर राजु शेंडे, पँथर सुनिल कापशेकर यांनी परिश्रम केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा