न्यायासाठी बोलणारा आवाज

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

समतानगरवाशी यांच्या वतीने राबविले दीक्षाभूमी मध्ये स्वच्छता अभियान

प्रतिनिधी अर्पित वाहाणे

 वर्धा -  समता नगर येथील रहिवासी असलेले समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजू थुल मा.सुभाष गायकवाड गोकुळ कांबळे  रत्नाकर  गावंडे बंडूजी नाखले यांनी दिक्षाभूमी स्वच्छता करण्यासाठी संकल्प केला होता व आज तो पूर्णत्वास नेला वर्धा येथून सकाळी 6 वाजता नागपूरकडे प्रस्थान करून 7.20ला पोहचलो व स्वच्छता अभियानास सुरुवात झाली कशाचीही तमा न बाळगता पाच लोक कामाला लागले तब्बल 3 तासाच्या परिश्रमानी दिक्षाभूमी oवरील मैदान, संडास बाथरूम स्वच्छ केले. त्यानंतर अनेक बौद्ध बांधवाची उपस्थिती होती. या स्वच्छता अभियाणानंतर  समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा